तापमानवाढीमुळे कमी होते स्पर्म क्वालिटी आणि स्पर्म काउंट
राज्यातील अनेक जिल्ह्यांत कमाल तापमान ४१ ते ४२ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही दुपारी १२ ते ५ या वेळात सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घातली आहे. उच्चांकी उष्णतेचा दाह फक्त शरीरालाच हानी पोहचवत नाही तर, शरीरातील सूक्ष्म जैव घडामोडींवर देखील विपरीत परिणाम करीत असतो. प्रामुख्याने अतिरिक्त उष्णतेमुळे पुरुषांच्या टेस्टीज चे तापमान वाढते आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो. तेव्हा, पालकत्वाचा प्रवास करीत असलेल्या दाम्पत्यांनी अतिरिक्त उष्णतेपासून स्वतःचा बचाव करावा, असा सल्ला प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर चे वंध्यत्व निवारण विशेषज्ज्ञ डॉ. नरहरी मळगांवकर यांनी दिला आहे.